Tuesday, September 6, 2016

सुपारी

संध्याकाळचे ५ वाजले होते. साधारणता ४ फुट उंच, मध्यम बांधा, फुल पँट, हाफ हाताचं शर्ट, केसांवर कंगवा फिरवत, ढोलासारखे पोट पुढे घेऊन आमचा रघु धावत धावत मदनच्या घरी जाताना दिसला. मीही त्याची नजर चूकवत त्याच्या मागोमाग गेलो. बघतो तर काय, कोणीतरी झोपलं होतं त्याला खडबडून उठवलं.

काकांनू तुम्ही काय! माका वाटला मदन झोपलो हां" रघु घाबरत घाबरत बोलू लागला.
"फटकी भरली तुझ्या तोंडार मेल्या माझो आत्ताच खय डोळो लागलेलो. आधी बघ तरी कोण हा तो" कांकानी ठेवनीतल्या शिव्या झाडल्या.
"चुकान झाला ओ, माका वाटला मदन, तुम्ही झोपा बघू आणि मदन खया?"
"मदन, तो बघ भुतूरल्या खोलयेत झोपलो हां." अस म्हणत काका परत झोपी गेले.
ये मदन, पाच वाजले तरी तीया झोपलसंचमेल्या येळ काय ठरलेली, चाराक जमाचा होता तरी एका कोणाचो पत्तो नाय म्हणांन तुमका बघुक वर इलय” रघु मदनला चांगलाच झापत होता.
आता मात्र माझी ट्युब पेटली होती. काल रात्री ठरल्याप्रमाणे मंडळी जमली नव्हती म्हणूनच हा रघु एवढा रागवत होता. हा सर्व प्रकार पाहून मी त्याच्या समोर जाण्याची हींमतच केली नाही.
"होय रे मीया साडेतीनचो अलाराम लायललय, पण तो वाजाकच नाय, थयच ह्यो सगळो घोळ झालो." मदनने डोळे चोळत चोळत उत्तर दिले.
"मराक व्हयेत अलाराम, तीया मेल्या मेन माणूस मरे, तीयाच असा केलस तर बाकी मंडळींका काय बोलतलसं. चल आता, पटकन तोंडार शीरा मार आणि खायल्यांच्या घराकडे ये. मीया ह्या मधल्यांका जागयतय." रघु तोंडाची पट्टी चालवल्यागत बोलत होता आणि मदन झोपेच्या नांवाने दगड फोडत होता. 
"तुमचा काय नाय रे, सुपारी मीया घेतलयं, येळात नाय गेलव तर तो सरपंच माका काय ठेवचो नाय." अस म्हणत हा आमचा रघु इतर मंडळींची तयारी झाली की नाही हे पहायला निघतो. वाडीतील सर्व  मंडळींना आवाज देत कसे-बसे सहा वाजता नियोजीत स्थळी जमतात आणि सरपंचांच्या घरी जायला निघतात.

वाचकहो, वरील सर्व संवादावरुन तुम्हाला समजलच असणार हे काय ते.
बरोब्बर....“ ह्या आमच्या तळकोंकणातला गणपती भजन मंडळ" चतुर्थीत आमच्या कोंकणात भजनांच्या सुपाऱ्यांचा पाऊस आणि त्यानंतर असणारी ही अशीच घाई-गडबड असते. हा मदन म्हणजे आमचा पेटीवाला बुवा तर रघु म्हणजे आमचा तबलजी, ठरविलेल्या वेळेत हजर राहणारा एकमेव हौशी कलाकार.

श्रावण महीन्यापासून आपल्या हींदू धर्मात विशेषत: महाराष्ट्रात विविध सणांना प्रारंभ होतो. गटारी अमावस्याच्या नावांने तळीराम आपली गटारी साजरी करतात आणि पुढचा एक महीना गणपती विसर्जना पर्यंत श्रावण पाळतात. श्रावणात मांसहारी चालत नाही परंतु मद्य प्राशाण केलेलं चालते असा गोड समज अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात रुढ होताना दिसत आहे. श्रावणातील नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि त्यानंतर येणारा आपल्या सर्वाचा लाडका सण म्हणजेच श्रीगणेश चतुर्थी’.

उर्वरीत भाग लवकरच....

No comments:

Post a Comment